पोस्ट्स

मे, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

... असेही एकदा घडावे ...!

                         ..... असेही एकदा घडावे !!   काहीच नवं होत नाहीये म्हणून आवडीची एखादी लकेर गुणगुणावी.. ..... आणि सूर लागता लागता अखंड गाणेच मनातून उमलून यावे.. तेव्हा आनंदाचा एक किरण लख्ख हदयात उमटावा.....                 ............ असेही एकदा घडावे!! निराशेचा कहर पसरत असताना, संपून जाणाऱ्या जीवांकडे तटस्थपणाने पहात , आपलेही जगणं काळाच्या खुंटीला टांगून ठेवावंसं वाटत  असताना, कुठून तरी नेणिवेचा पवित्र हुंकार यावा आणि जगण्याचा शुभ्र  चांदणप्रकाश पुन्हा पसरावा...                     ........... असेही एकदा घडावे !! आयुष्याच्या देण्यांची पूर्तता करून झाल्यावर  .जीवाचे पोकळ अस्तित्व जाणल्यावर , पैलतीराचे वेध लागलेल्या थकलेल्या मूर्तीकडे कासावीस होऊन पाहताना....     ..... अचानक एखादया लहानग्याचा खळाळता  हसणारा धबधबा कोसळत यावा आणि प्राक्तनाची क्षणभंगुरता वाहून जावी..         ...

पुन्हा गवसला सूर......!!

                        पुन्हा गवसला सूर...!!! हेमांगी नेहमीच्या नऊच्या ठोक्याला आपल्या ओपीडीमध्ये म्हणून जाण्यास निघाली .पण वाटेत तिने भैरवीला फोन केला.. " हॅलो भैरवी मी आता येतेय तुझ्याकडे... तुझं आवरलय ना सगळं... आज दिवसभर मी तुझ्याकडेच थांबेन." असे म्हणून तिने फोन ठेवला.. भैरवी .! तिची अगदी बालपणापासूनची मैत्रीण . शाळा, कॉलेज, क्लास सारं काही एकत्रच केलं . दोघींच्याही आवडीनिवडी वेगळ्या, करिअरची क्षेत्रं वेगळी .. तरीही एकच धागा त्यांना जोडणारा होता तो म्हणजे गाणं .!त्यामुळेच त्यांची मैत्री अखंड राहिली होती अगदी आजपर्यंत!दोघींनाही गाण्याची अतिशय आवड... अगदी क्लासिकल साँग पासून आजच्या उडत्या चालीच्या गाण्यापर्यंत त्यांना कशाचंही वावडं न०हतं. पण भैरवी नं गायनाचं २ीत सर शिक्षण घेतलं होतं .. हेमांगीलाही त्याचा सार्थ अभिमान होता . अवघ्या एका गाण्यावर... न०हे एका ओळीवरही.... गायकाने सूर पकडलेल्या नेमक्या जागेवर त्या तासनतास चर्चा करत असत...             मधल्या दहा वर्षामध्ये मात्र दोघींचेही मार्ग वेगळे ...