पोस्ट्स

जुलै, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

.....आताशा थोडे जगायला जमत होते.!!

.... आताशा थोडे जगायला जमत होते..!!     मुखवट्यामागचे  चेहरे ओळखत पारखून घेत,     शब्दांचे अर्थ समजता समजता उलगडत,    आताशा थोडे जगायला जमत होते...!            नशिबाला जरासा वळसा घालत,            कर्माला थोडी जास्त गती देत,             हातातून सुटलेल्या स्वप्नांनाही जवळ करत करत           ...... आताशा थोडे जगायला जमत होते...!  कधीतरी स्वतःला चकवा देत नाईलाजाने,  आणि परक्याला कौल देत नकळतपणे,  दुरावत राहिलो  सतत माझ्यातून मला,  कधी तरी आपला आवाज ऐकत उदासपणे ......  आताशा थोडे जगायला जमत होते. .!  पण तरीही चकवत राहिल्या जगण्यातल्या वाटा,  वळणेच तिरकी आयुष्यातली मग चालावे सरळ कसे,  तरीही काळोखातून कानोसा घ्यायचे ठरवले होते ..... आताशा थोडे जगायला जमत होते. ...!  मग वाटले कधी आपलाही तळ शोधत जाऊ,  हरवलेल्या मनाचा आपणच सुर होऊन पाहू...  करताना असे कधीतरी सापडेलच की मुक्काम...

शल्य..!

                          शल्य...!  मेघनाने धावत-पळत एसटी स्टँड गाठले ...सव्वानऊ वंजारवाडी ची एसटी नेमकी आज वेळेवर येऊन थांबली होती..जागेवर जाऊन बसे पर्यंत एसटी वाहकाने एसटी निघणार असल्याची रिंग वाजवली ,,मेघना ने हुश्श केले..नशीब  एसटी वेळेवर निघाली..नाहीतर आजचे काम उद्यावर जाणार होते..वंजारवाडी ला जाणारी ही एकच एसटी...हीच दोन तासात गावी पोहोचणार..तासभर गावी थांबून पुन्हा त्याच पावली परत येणार ...फक्त सोमवारी आणि शुक्रवारी ही सोय होती..इतर दिवशी मात्र मग खाजगी किंवा स्वतःच्या ओळखीच्या वाहनांवर भिस्त..!               आज मेघना आवर्जून वंजारवाडीला जाण्याचे कारण म्हणजे सरिता वहिनींचा आलेला फोन..!सरिता वहिनी तशा अलीकडच्याच परिचयाच्या ...कष्टाळू, समंजस आणि आपण बरं आपलं काम भलं..अशा प्रवृत्तीच्या.! .त्यांच्या मानाने अगदीच सुमार बुद्धिमत्तेचा आणि कष्टाची सवय नसलेला नवरा त्यांच्या पदरात होता ..एकच मुलगा शाळेत जाणारा..त्याच्या आशेवर सरिता बाईंनी कसोशीने संसार केला. पण घरचे दारिद्र्य ...

कृतज्ञ..!

              मित्रांनो,  जगण्याचा मार्ग हा एकच असतो पण प्रत्येका चा वेगवेगळा.! वाटेवरून पुढे चालत असताना येणाऱ्या क्षणांसाठी चैतन्य उसळत असते पण हुरहूर लागली की आपण मागे वळून पाहतो. मग सुरू होतो आठवणींचा आणि अनुभवांचा प्रवास. तो प्रवास उलटा हि करता येतो पण केवळ कल्पनेने किंवा मनाने! प्रत्यक्ष अनुभूती त्यात नाही म्हणून जगण्याच्या प्रत्येक क्षणाला जाणिवेचा स्पर्श असणे महत्त्वाचे. . पण ती प्रत्येकाला जमतेच असे नाही. ते केवळ दैवी देणेच! असा दैवी स्पर्श लाभलेल्या व्यक्ती या नेहमीच नवनिर्मितीचा ध्यास असणाऱ्या असतात. सतत आपल्या काल गतीने चालणारा निसर्ग त्यांना नेहमी प्रेरणा देतो. सहज घडणाऱ्या प्रसंगातून ही त्यांना भावनेचा ओलावा टिपता येतो .त्यांचे असे जगणे सर्वांना हवेहवेसे वाटते .त्यांचा सहवास हा सर्वांना प्रफुल्लित करणारा असतो .त्यांच्यामुळे आपल्यासारख्या सामान्य माणसांच्या जीवनात एक विलक्षण विरंगुळा निर्माण होतो. अशी माणसं वाचण्याचा ..!अशी माणसं वाचताना त्यांच्या अनुभवाचा प्रत्यय घेणे हा ही एक सुखद अनुभव असतो.अशा माणसांच्या अनुभवाने सहाय्याने आपण आपल...